मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे ७, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शुद्धलेखनाचे काही नियम

१) अनुस्वार शुद्ध कसे बोलावे व लिहावे हे आपल्याला व्याकरण शिकवते. व्याकरणात त्याविषयी काही नियम असतात. व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन होय. शुद्धलेखनाचे काही नियम :- १) अनुस्वार :- १) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो; त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. उदा. तंटा, चिंच, उंट, आंबा, तंतू, घंटा, करंजी, गुलकंद, हिंग, सुंठ, गंमत, गंगा, कुंकू, कंकण २) नाम व सर्वनाम यांच्या अनेकवचनी सामान्यरूपांतील शेवटच्या अक्षरावर, विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदा. झाडांचा, पक्ष्यांचा, त्यांचा, मुलांसाठी, कागदांवर ३) एखादे नाम आदरार्थी अनेक वचनात वापरताना त्याच्या सामान्यरूपाच्या अखेरच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. उदा. शिक्षकांना, वडिलांना २) ऱ्हस्व - दीर्घ :- १) मराठीतील इकारान्त व उकारान्त तत्सम (संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले) शब्द दीर्घ स्वरान्त लिहावेत.  उदा. अणू, गुरु, आकृती  २) इतर शब्दांच्या शेवटी येणारे इकार, उकार, दीर्घ लिहावेत. उदा. गडू, घुंगरू, खाऊ, कचेरी ३) सामासिक शब्दातील पहिले पद इकारान्त किंवा उकारान्त ...