-: महात्मा जोतिबा फुले :- ( इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९० ) हे मराठी, भारतीय समाज सुधारक होते. बालपण त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोर्हे हे मूळ आडनाव होते. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी सावित्री बाईंना शिक्षित करून शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका झालेल्या देशातल्या पहिल्या स्त्री होत्या. स्वतंत्रपणे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तुकारामां प्रमाणेच ते आयुष्यभर अभंगांचीं अखंड रचना करत राहिले. 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिके तील कृष्ण वर्णीयांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितां कडून होणार्या अन्याय, अत्याचारा पासून , गुलाम गिरीतून शूद्राति शूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जा...
It helps to develop basic primary education