Educational पाचवीपासून ठरणार पास-नापास पुणेः नापास न करण्याचे धोरण चौथीपर्यंतच राबवून पाचवीपासून रीतसर पास-नापासाची पद्धत सुरू करण्याची सूचना राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. पाचवीत एखाद्या किंवा काही विषयांत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष थांबवून त्या विषयांचे अधिक प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाचवीपर्यंत नापास न करण्याची सूचना केंद्राच्या धोरणाबाबतच्या टिपणात असताना राज्यात ते चौथीपर्यंतच का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. View More Avoid high medical expenses w/ health policy Ad: Religare Health Insurance शिक्षणहक्क कायद्यानुसार देशभरात सध्या इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. मात्र, यामुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याची देशव्यापी तक्रार असल्याने हे धोरण पाचवीपर्यंतच राबविण्याची सूचना नव्या शैक्षणिक धोरणासाठीच्या टिपणात करण्यात आली आहे. याबाबत राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राकडून विचार केला जात असून, याबाबत पुढील आठवड्यात दिल्लीतील बैठकीत सू...
It helps to develop basic primary education