मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निष्ठा प्रशिक्षण

*निष्ठा प्रशिक्षण* मित्रांनो , राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ . १ ली ते इ . ८ वीस अध्यापन करणाऱ्या १०० % शिक्षक , मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यासाठी NISHTHA National Initiative for School Heads ' and Teachers ' Holistic Advancement ) या प्रशिक्षणाच्या राज्यस्तरीय व तालुकानिहाय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे . निष्ठा (NISHTHA) प्रशिक्षण ? मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विदयमाने देशभरातील प्राथमिक स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी निष्ठा (NISHTHA - National Initiative for School Heads and Teachers Holistic Advancement) हा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आलेला आहे. सदर प्रशिक्षणाची अंमलबजावणी माहे 30डिसेंबर 2019 ते 10 जानेवारी कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये करण्यात येणार आहे. NISHTHA या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख हेतू शालेय शिक्षणामधील गुणवत्ता वाढविणे हा आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीसाठी अध्यापन करणा...

पृथ्वी

*१२ डिसेंबर २००१* *भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.*   "पृथ्वी" हे भारतीय सैन्याचे "पृष्ठभाग ते पृष्ठभाग" (Surface to Surface) निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र (Short Range Ballistic Missile) आहे. हे प्रक्षेपास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा" अंतर्गत विकसित केले आहे. विकास आणि इतिहास भारत सरकारने वेगवेगळी युद्ध क्षेपणास्त्रे व पृष्ठभाग ते आकाश या मालिकेतील क्षेपणास्त्रांवरील स्वावलंबनासाठी १९८३ साली "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम" सुरू केला. या अंतर्गत विकसित केलेले पृथ्वी हे पहिले प्रक्षेपास्त्र आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी "प्रोजेक्ट डेव्हिल" अंतर्गत सोविएत रशियाच्या एसए-2 पृष्ठभाग ते आकाश या क्षेपणास्त्राची उलट अभियांत्रिकी केली होती. "पृथ्वी"ची प्रणोदन प्राद्योगिकी (Propulsion Technology) ही एसए-2 पासुन उत्पादित केली असल्याचे मानले जाते...

MDM पोर्टल वर विद्यार्थी संख्या कशी अपडेट कराल

 येथे क्लिक करा  https://youtu.be/QCo-MpFbqXA सदर लिंक मधील व्हिडीओ पहावा

बाबासाहेब सर्वांचे

                  "शोषित समाजाचे नेते" ही एवढीच ओळख डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर खूप अन्याय करणारी आहे. धर्माच्या मान्यतेने उभ्या असलेल्या जातीव्यवस्थेने केलेले शोषण आणि अन्यायाच्या परिणामी जाणीवपूर्वक मागे ठेवल्या गेलेल्या जातीसमुहांच्या न्याय्य अधिकारांसाठी, मानवीय अधिकारांसाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष केवळ शोषित जातीसमुहांसाठी महत्वाचा नव्हता तर सर्व भारतीयांच्या रास्त विकासासाठी आणि भारतीय समाजाच्या न्यायिक अधिष्ठानासाठी पण महत्वाचा होता. पण बाबासाहेबांचे कर्तृत्व आणि योगदान हे तर यापलीकडे कितीतरी अर्थांनी महत्वाचे आहे.        बाबासाहेबांनी उच्च शिक्षणातील ज्या अनेक पदव्या मिळवल्या त्यातल्या बहुतांशी पदव्या ह्या भारतीय अर्थकारण, भारतीय चलन आणि विदेश व्यापाराशी संबंधित आहेत. या शिक्षणक्रमात त्यांनी सादर केलेले अनेक शोधनिबंध हे इंग्रज भारताची करत असलेली आर्थिक लुट आणि भविष्यातील भारताच्या आर्थिक विकासाची दिशा स्पष्ट करणारे आहेत. *भारताच्या विकासातील अर्थशास्त्री बाबासाहेबांचे जे योगदा...

प्रज्ञासूर्य जन्मला

अपंगत्वावर मात करणाऱ्या प्रेरणा दायी व्यक्ती

♿ आज 3 डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अपंगत्व तुमच्या मनात आहे, माझ्यात नाही, हे सांगणाऱ्या काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची माहिती आज आपण जाणून घेऊ...   *1) हेलन केलर* :  मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व व अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या त्यांच्यावर कोसळली. या अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण करून त्या अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका व समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या. *2) लुईस ब्रेल* :  वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे. *3) सुधा चंद्रन* :  एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली. *4) ऑस्कर पिस्टोरियस* :  पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्र...

सामान्य ज्ञान चालू घडामोडी

1) क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध कोणत्या कंपनीने तयार केले? उत्तर : मायलान 2) एशियामनी कडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान कोणत्या कंपनीला मिळाला? उत्तर : TCS 3) "गर्ल, वुमन, अदर" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? उत्तर : बर्नार्डिन इव्हारिस्टो 4) जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? उत्तर : 6 ऑक्टोबर 5) ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली? उत्तर : नवी दिल्ली 6) 2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर : अभिजीत बॅनर्जी 7) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर : 15 ऑक्टोबर 8) 2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर : मार्गारेट अ‍ॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो 9) ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे? उत्तर : जलशुद्धीकरण 10) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर : डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम

BODHAKATHA

गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक विस्ताराने सांगण्याचा आग्रह केला. त्यानंतर बुद्ध एक गोष्ट सांगू लागले. एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. गावाबाहेरील एका वसाहतीत त्याची छोटीशी झोपडी होती. त्याला एक मुलगा होता. गंभीर आजारामुळे काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यु झाला होता. त्यामुळे पत्नीनंतर त्यानेच आपल्या मुलाचे योग्य संगोपन केले होते. गावातील एका घरात तो व्यक्ती रात्रभर पहाऱ्याचे काम करत असे. मुलावर त्याचे प्रचंड प्रेम होते. मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता. मुलगा सुरक्षित राहावा यासाठी तो दररोज मुलाला लवकर झोपवून बाहेरून कुलूप लावून कामावर जात असे. दुर्दैवाने एका रात्री तो राहात असलेल्या वसाहतीवर दरोडा पडला. दरोडेखोरांना त्याच्या मुलाला बाहेर काढले. झोपडीतील सर्व सामान लुटले. ज्या घरात माणसे नव्हते अशा शेजारच्या काही घरातील सामान लुटले. हा सारा प्रकार अगदी गुपचूप झाल्याने आजूबाजूच्य...

शालार्थ बाबत महत्वाचे व्हिडीओ

📌 *शालार्थ-ऑनलाइन वेतन प्रणाली अपडेट्स व्हिडीओज*🖥 *🖥विडिओ क्र.1⃣* *♦शालार्थ पोर्टलमध्ये क्रियेटेड पोस्ट्स (मान्य पदे) तपासणे,शिक्षकांना डिटॅच करणे,शालार्थ चा डिफॉल्ट पा...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याबाबत

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेबाबत आवश्यक बाबी व कागदपत्रे.... 🔊 दिनांक १ ऑक्टोबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरण्यास सुरुवात.. 🔊शाळेचा u-dise क्रमांक ...

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक मित्र: स्वच्छतेवर आधारित घोषवाक्ये

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक मित्र: स्वच्छतेवर आधारित घोषवाक्ये : स्वच्छतेवर आधारित घोषवाक्ये स्वछातेचे घोषवाक्य घोषवाक्ये 1) गाडगेबाबांचा एकच मंत्र , स्वच्छतेचे जाणा तंत्र . 2) स्वच्छता ...

योगा

*ही सोपी योगासने करून तुम्ही राहा चुस्त, निरोगी, आणि तंदुरुस्त!!!* 1. ताडासन  ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आ...