Educational
पाचवीपासून ठरणार पास-नापास
पुणेः नापास न करण्याचे धोरण चौथीपर्यंतच राबवून पाचवीपासून रीतसर पास-नापासाची पद्धत सुरू करण्याची सूचना राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. पाचवीत एखाद्या किंवा काही विषयांत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष थांबवून त्या विषयांचे अधिक प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाचवीपर्यंत नापास न करण्याची सूचना केंद्राच्या धोरणाबाबतच्या टिपणात असताना राज्यात ते चौथीपर्यंतच का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.
View More
Avoid high medical expenses w/ health policy
Ad:
Religare Health Insurance
शिक्षणहक्क कायद्यानुसार देशभरात सध्या इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. मात्र, यामुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याची देशव्यापी तक्रार असल्याने हे धोरण पाचवीपर्यंतच राबविण्याची सूचना नव्या शैक्षणिक धोरणासाठीच्या टिपणात करण्यात आली आहे. याबाबत राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राकडून विचार केला जात असून, याबाबत पुढील आठवड्यात दिल्लीतील बैठकीत सूचना दिल्या जाणार आहेत.
‘पाचवीच्या टप्प्यावर परीक्षा घेऊन, एखाद्या विषयात खूपच मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे अधिक चांगले प्रशिक्षण एक वर्ष देण्याची आमची सूचना आहे,’ असे तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पाचवीला मुलांची परीक्षा घेऊन, ते कोणत्या विषयात कमकुवत आहेत, याचा आढावा घेतला जावा. ते कमकुवत असलेल्या विषयांच्या अधिक तयारीसाठी मुलांना एक वर्ष मागे ठेवून, त्यांना त्या विषयाचे प्रशिक्षण द्यावे, अशी राज्याची भूमिका असून, ती आम्ही केंद्राकडे मांडणार आहोत.’
‘नो डिटेन्शन पॉलिसी’ म्हणजे परीक्षाच बंद हे चुकीचे आहे. त्यामुळे अभ्यास बंद अशीच मानसिकता बनली आहे. परीक्षा घेतली पाहिजे, परीक्षा घेऊन ज्या विषयात मुले कमी आहेत, त्या विषयात त्यांना अधिक चांगले शिकविले पाहिजे, ही भूमिका असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.
पाचवीपासून ठरणार पास-नापास
पुणेः नापास न करण्याचे धोरण चौथीपर्यंतच राबवून पाचवीपासून रीतसर पास-नापासाची पद्धत सुरू करण्याची सूचना राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. पाचवीत एखाद्या किंवा काही विषयांत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष थांबवून त्या विषयांचे अधिक प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाचवीपर्यंत नापास न करण्याची सूचना केंद्राच्या धोरणाबाबतच्या टिपणात असताना राज्यात ते चौथीपर्यंतच का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.
View More
Avoid high medical expenses w/ health policy
Ad:
Religare Health Insurance
शिक्षणहक्क कायद्यानुसार देशभरात सध्या इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. मात्र, यामुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याची देशव्यापी तक्रार असल्याने हे धोरण पाचवीपर्यंतच राबविण्याची सूचना नव्या शैक्षणिक धोरणासाठीच्या टिपणात करण्यात आली आहे. याबाबत राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राकडून विचार केला जात असून, याबाबत पुढील आठवड्यात दिल्लीतील बैठकीत सूचना दिल्या जाणार आहेत.
‘पाचवीच्या टप्प्यावर परीक्षा घेऊन, एखाद्या विषयात खूपच मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे अधिक चांगले प्रशिक्षण एक वर्ष देण्याची आमची सूचना आहे,’ असे तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पाचवीला मुलांची परीक्षा घेऊन, ते कोणत्या विषयात कमकुवत आहेत, याचा आढावा घेतला जावा. ते कमकुवत असलेल्या विषयांच्या अधिक तयारीसाठी मुलांना एक वर्ष मागे ठेवून, त्यांना त्या विषयाचे प्रशिक्षण द्यावे, अशी राज्याची भूमिका असून, ती आम्ही केंद्राकडे मांडणार आहोत.’
‘नो डिटेन्शन पॉलिसी’ म्हणजे परीक्षाच बंद हे चुकीचे आहे. त्यामुळे अभ्यास बंद अशीच मानसिकता बनली आहे. परीक्षा घेतली पाहिजे, परीक्षा घेऊन ज्या विषयात मुले कमी आहेत, त्या विषयात त्यांना अधिक चांगले शिकविले पाहिजे, ही भूमिका असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा