*सातारा येथे असताना गाडगेबाबांची प्रकृती साथ देत नव्हती . तेव्हा बाबांनी आर्वजून डाँ.आंबेडकरांना भेटीचा निरोप पाठाविला. निरोप मिळताच आंबेडकरांनी आपली कामे बाजूला ठेवून सातारा गाठले.आंबेडकरांना पाहताच गाडगेबाबांना खूप समाधान वाटले. त्यानी आपल्या उशिखालून कांही दस्त काढले .ते आंबेडकरांच्या हातात देत बाबा म्हणाले' सायबा ही लाख मोलाची दौलत हाय. तवा ही दौलत योग्य माणसाच्या हातात देऊन मी मोकळा होणार .म्हणून सायबा तुला बोलावलो बघ.हे दस्ताची योग्य पुर्तता केल्याली हाय तवा ही दौलत तुझ्याकड दिलो तर मी मोकळा .'आंबेडकरानी दस्तऐवज पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटले कारण तो दस्त सातारा येथिल जमिनीचा होता .त्या सर्व जमिनीचे सर्व अधिकार गाडगेबाबांनी आंबेडकरांना दिले होते.दान मिळालेल्या जमिनीचा योग्य कामासाठी वापर व्हावा हिच बाबांची इच्छा ओळखून आंबेडकरानी कर्मवीर भाऊराव पाटलांना निरोप दिला आणि ती सर्व जमिन आंबेडकरांनी गाडगेबाबांच्यासमक्ष कर्मवीराना बहाल केली.
वरील जो दुर्मिळ फोटो पेस्ट झाला आहे .तो या घटनेची साक्ष आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा