рдоुрдЦ्рдп рд╕ाрдордЧ्рд░ीрд╡рд░ рд╡рдЧрд│ा

ЁЯФн *рд░ाрд╖्рдЯ्рд░ीрдп рд╡िрдЬ्рдЮाрди рджिрд╡рд╕* ЁЯФн


*२८ फेब्रुवारी १९२८ रोजी सर सी.व्ही.रामन यांनी Raman Efect चा शोध लावल्याबद्दल हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित केला गेला. याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक भारतीयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे होय.*

बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की *वैज्ञानिक दृष्टिकोन* बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा, बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण 'विज्ञानयुग' आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली. त्यातही गेल्या काही दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे. आज अवकाशात झेप घेऊन, सागरात सूर मारून माणूस शब्दश: त्रिलोकसंचारी झाला आहे. मूलभूत गरजांच्या पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळयाच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत. व्यक्तिगत परिचर्येपासून सामाजिक स्थैर्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची प्रगती, तिचं सहज विस्मरण होण्याइतकी झाली; पण या सगळया प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, ती येत नाही. विज्ञानाची प्रगती कुतूहल, चौकसपणा या गुणांच्या आधारावर सृष्टीची कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून झाली; पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही रुजलेली दिसत नाही. का, कसं हे कुतूहल नाही, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुख्य म्हणजे हा अभाव सगळीकडेच जाणवतो. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सगळीकडेच! निरक्षरता किंवा अपुरं शिक्षण, हे त्याचं कारण नाही, कारण जिथे आपण शिक्षण घेतो, त्या शाळा, कॉलेजांमध्येही, ही चिकित्सेची जाणीव करूनच दिली जात नाही. माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारणभाव शोधण्याची सवय होणं, तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही त्यातच येतात, कारण तिथेही *कार्यकारणभाव आणि चिकित्सा* लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे.

рдЯिрдк्рдкрдг्рдпा

рдпा рдм्рд▓ॉрдЧрд╡рд░ीрд▓ рд▓ोрдХрдк्рд░िрдп рдкोрд╕्рдЯ

рд╡ाрдХ्рдк्рд░рдЪाрд░ рдЗрдпрдд्рддा рдЪौрдеी

рд╡िрд╖рдп : рдорд░ाрдаी ( рдмाрд▓рднाрд░рддी) рд╡ाрдХ्рдк्рд░рдЪाрд░ рд╕ंрдЧ्рд░рд╣ *реи.рдмोрд▓рдгाрд░ी рдирджी* рез) рдпुрдХ्рддी рд╕ुрдЪрдгे - рдХрд▓्рдкрдиा рд╕ुрдЪрдгे. реи)рдкрд░рд╡ाрдирдЧी рдоिрд│рдгे - рд╕ंрдорддी рдоिрд│рдгे, рд╕рд╡рд▓рдд рдоिрд│рдгे, рдоोрдХрд│ीрдХ рдоिрд│рдгे. рей)рд╢ाрд│ा рдмुрдбрд╡рдгे - рд╢ाрд│ेрд▓ा рди рдЬाрдгे. рек)рдирд╡рд▓...

♿♿ *рдЕрдкंрдЧ (рджिрд╡्рдпांрдЧ) рд╡्рдпрдХ्рддि рдЕрдзिрдХाрд░ рдХाрдпрджा - реирежрезрем* ♿

🙏🏻🙏🏻 *рдХाрд╣ी рдорд╣рдд्рд╡ाрдЪी рдХрд▓рдоे...!* 🙏🏻🙏🏻 *# рдХрд▓рдо рей (рез)* рджिрд╡्рдпांрдЧ рд╡्рдпрдХ्рддींрдиा рд╕рдоाрдирддा, рд╕рди्рдоाрди, рдЖрджрд░, рд╕рдЪोрдЯी рд╡िрд╖рдпी рд╣рдХ्рдХ рдЗрддрд░ांрдк्рд░рдоाрдгे рдмрдЬाрд╡рддा рдпेрдИрд▓. рд╣ि рд╕ुрдпोрдЧ्рдп рд╢ाрд╕рдиाрдЪी рдЬрдмाрдмрджाрд░ी рдЕрд╕ेрд▓. *# рдХрд▓рдо рек (рез)* рдж...

рдХ्рд░ांрддिрд╕िंрд╣ рдиाрдиा рдкाрдЯीрд▓

рдХ्рд░ांрддिрд╕िंрд╣ рдиाрдиा рдкाрдЯीрд▓ рд╕्рдоृрддिрджिрди рд╡िрд╢ेрд╖- (рем рдбिрд╕ेंрдмрд░ реирежрезрен) рд╕ाрдоाрди्рдпрддः рд╕рд░्рд╡ рд╕рдоाрдЬ рдЕрдЧрд░ рдоाрдгрд╕े рдХाрд▓рдк्рд░рд╡ाрд╣ाрдк्рд░рдоाрдгे рд╡ाрд╣рдд рдЬाрдг्рдпाрдд рдзрди्рдпрддा рдоाрдирддाрдд рдЖрдгि рдпाрддрдЪ рдЖрдкрд▓ा рдоोрдаेрдкрдгा рд╕िрдж्рдз рдХрд░рдг्...